tag:blogger.com,1999:blog-15675925.post1312579664184601614..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: ३० जानेवारीTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger81125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-40011295046073377412011-05-03T12:31:31.930-07:002011-05-03T12:31:31.930-07:00तुझा पोस्टची वाचला आणि त्यावर आलेल्या पोस्टपेक्षाह...तुझा पोस्टची वाचला आणि त्यावर आलेल्या पोस्टपेक्षाही लांब लचक असलेल्या कमेंटही वाचल्या... :) शेवटी काय प्रत्येकजण त्याच्या जागी योग्यच असतो लक्ष्यात ठेव... मग गांधी काय किंवा गोडसे काय.... सावरकर काय आणि बाबा काय... कसे काय? :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-78690490706056972472011-02-17T14:53:41.323-08:002011-02-17T14:53:41.323-08:00श्रीताई,
अगं इथे नाही दिसली तरी तुझ्या शुभेच्छा आह...श्रीताई,<br />अगं इथे नाही दिसली तरी तुझ्या शुभेच्छा आहेतच हे ठाऊक आहे मला! :)<br />नाही मोजत आता, पहिले शंभर म्हणून नवलाई ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-11604278901038952072011-02-16T21:10:22.240-08:002011-02-16T21:10:22.240-08:00अरे देवा! काहितरी घोळ झालेला दिसतोय विद्या. तुझ्या...अरे देवा! काहितरी घोळ झालेला दिसतोय विद्या. तुझ्या अभिनंदनाची दिलेली पावतीच कुठे दिसत नाहीये. :( <br /><br />ब्लॊगच्या वर्षपूर्ती प्रित्यर्थे अभिनंदन व भरभरून लिहीण्यासाठी पोतडीभरून शुभेच्छा! मोजू नकोस रे, तू लिहीत राहा. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-91747671461649576542011-02-08T08:08:22.065-08:002011-02-08T08:08:22.065-08:00सुषमेय,
अनेक आभार! असाच लोभ राहू द्या! :)सुषमेय,<br />अनेक आभार! असाच लोभ राहू द्या! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-46986151847853600942011-02-08T05:54:09.202-08:002011-02-08T05:54:09.202-08:00ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा आणि शंभरीबद्दलही!...ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा आणि शंभरीबद्दलही!SUSHMEYhttps://www.blogger.com/profile/05031625352937995102noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37783220341896374512011-02-05T23:15:33.793-08:002011-02-05T23:15:33.793-08:00विनायकजी,
:)
तुम्ही एव्हढ्या आवर्जून प्रतिक्रिया ल...विनायकजी,<br />:)<br />तुम्ही एव्हढ्या आवर्जून प्रतिक्रिया लिहिलीत त्याचा आनंद झालाच..इतकं सारं वाचून एकदम छान वाटलं पण तेव्हढीच जबाबदारीही आल्यासारखं वाटलं...<br />खूप खूप धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-36968931117967538242011-02-05T07:00:54.696-08:002011-02-05T07:00:54.696-08:00विभी! काय बोलू? काही अचानक आलेल्या घरगुती अडचणींमु...विभी! काय बोलू? काही अचानक आलेल्या घरगुती अडचणींमुळे प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला.तुम्ही लिहिलेलं आवडतं.समतोल तुम्ही कधीच सोडत नाही.तुम्हाला प्रत्यक्षही भेटलोय.एवढा विचार करणारा माणूस चांगला रसिक आहे हे बघून जास्त आनंद झाला.मला अतिरिक्त चर्चा सुरू झाल्या की ज्याम बोअर होतं खरंतर! (तो माझा दोष असावा)पण इथे प्रतिक्रियाही खूप उदबोधक वाटल्या.आणि एक... तुम्ही लिहा हो! वेगात लिहिलंत तरी तुमची मांड सुटत नाही असं माझं मत आहे.सगळ्या पोस्ट्स मला ताकदीच्या वाटल्या आहेत.अनेक अनेक शुभेच्छा!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-81950424057519093662011-02-03T23:03:04.187-08:002011-02-03T23:03:04.187-08:00अवधूत,
धन्यवाद रे भाऊ!!अवधूत,<br />धन्यवाद रे भाऊ!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-15899049152938944542011-02-03T09:36:30.523-08:002011-02-03T09:36:30.523-08:00बाबा अभिनंदन....असंच येऊदे....बाबा अभिनंदन....असंच येऊदे....AJ Kharehttps://www.blogger.com/profile/13773132132270223364noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-25415030882138158212011-02-01T13:09:09.135-08:002011-02-01T13:09:09.135-08:00सर्वांसाठी सूचना ही की ह्यापुढे इथे आलेल्या कुठल्य...सर्वांसाठी सूचना ही की ह्यापुढे इथे आलेल्या कुठल्याही निनावी प्रतिक्रियेला उत्तर दिलं जाणार नाही. माझ्याकडे खरंच वेळाचा तुटवडा आहे. ब्लॉगवर नाव नको असल्यास कृपया मला वैयक्तिक इमेल करावा!<br />धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-29952605182158943272011-02-01T12:52:11.949-08:002011-02-01T12:52:11.949-08:00आशीष,
ब्लॉगवर स्वागत! तुम्ही १०० व्या पोस्टवर आलात...आशीष,<br />ब्लॉगवर स्वागत! तुम्ही १०० व्या पोस्टवर आलात, आनंद वाटला. माझा लेख तुम्हाला थोडाफार का होईना संतुलितही वाटला, ह्याचा आनंद झाला.<br />तुमची प्रतिक्रिया वाचून मला तुमच्या चांगुलपणाबद्दल खात्री पटली. अन गांधींच्या माणसातल्या ज्या चांगुलपणावर विश्वास होता, तो तुमच्यात आहे हे दिसलं. <br />तुम्ही फक्त शेअर करताय अन त्यामुळे त्यात कुठेही तुम्हाला चर्चा अपेक्षित अन इच्छित नाही हे मी जाणतो. त्यामुळे फक्त मी माझ्या ब्लॉगवरच्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर लिहितो, त्याप्रमाणे तुम्हालाही लिहितो.<br />तुमची प्रतिक्रिया भावनिक दृष्टिकोनातून आहे अन मला त्याचा पूर्ण आदर आहे. मीदेखील कित्येकदा आवडत्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना भावनेत वाहून जातो अन तो मनुष्यस्वभाव आहे. अन गांधींबद्दल बोलण्यासाठी गांधींइतकं मोठं व्हावं हे जरी कितीही छान वाटलं तरी सद्यस्थिती पाहता ते मला पटत नाही. कारण माझ्यामते आज गांधींना प्रमाणाबाहेर मोठं करण्यामागे कुणाचं गांधींवरचं प्रेम नाहीये, तर राजकीय हेतू आहेत. अन त्यातून लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करण्याखेरीज काहीच साध्य होत नाही. तत्कारणात, दुसरा दृष्टिकोनही लोकांसमोर माझ्यापरीनं आणावा असं मला वाटतं.<br />मी कधीच मला गांधीच काय, सावरकरही समजले असं म्हणत नाही. पण त्यांच्या कृतींचे माझ्या विश्वाशी निगडित परिणाम अभ्यासणं अन लोकांसमोर मांडण्यामध्ये मला काही गैर वाटत नाही.<br />बाकी तुमची अगदी मनापासून असलेली प्रतिक्रिया फारच आवडली. पण खरंच मी इतक्या भावनिक अन काव्यात्म पातळीवरून देशाच्या इतिहासाबद्दल विचार करू शकत नाही.<br />तुम्हाला कुठेही दुखावलं असल्यास क्षमा करा! माझा तसा हेतू बिलकुल नव्हता!<br />प्रतिक्रियेबद्दल आभार! अन भेट देत राहा! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-11094654032366839772011-02-01T12:40:55.195-08:002011-02-01T12:40:55.195-08:00अनघाताई,
कार्याची गरज तर आहेच. पण कधीकधी दोन वेगळ्...अनघाताई,<br />कार्याची गरज तर आहेच. पण कधीकधी दोन वेगळ्या तापमानाचं पाणी संपर्कात आलं की त्यांची तापमानं समान व्हायला उष्णतेचं वहन होतं, तद्वतच विचारांचं वहन होणं बहुतेक गरजेचं होतं. बरेचदा खूप विचारवहन होऊनही तापमान समान होत नाही हे दुर्दैव आहे, पण बरेचदा दुसरा पर्याय नसतो! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37630058412028678802011-02-01T12:40:33.876-08:002011-02-01T12:40:33.876-08:00सुहासा,
धन्यवाद रे भाऊ! अरे सपाटा लावताना पार सपाट...सुहासा,<br />धन्यवाद रे भाऊ! अरे सपाटा लावताना पार सपाट व्हायची पाळी आली होती रे! :P<br />खूप खूप धन्यवाद रे! तुम्ही सगळे पाठीशी आहात हे ठाऊकच आहे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40378676376264754462011-02-01T12:40:17.295-08:002011-02-01T12:40:17.295-08:00विक्रम,
तुलाही विचार पटले ह्याचा आनंद वाटला.
अनेक ...विक्रम,<br />तुलाही विचार पटले ह्याचा आनंद वाटला.<br />अनेक आभार भाऊ! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-78553519118818839342011-02-01T12:39:50.742-08:002011-02-01T12:39:50.742-08:00तृप्ती,
ब्लॉगवर स्वागत! तुमची प्रतिक्रिया वाचून खू...तृप्ती,<br />ब्लॉगवर स्वागत! तुमची प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला. खूप धन्यवाद!<br />भेट देत राहा..असाच लोभ राहू दे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-46131717544650496462011-02-01T12:39:30.207-08:002011-02-01T12:39:30.207-08:00contd..
त्याचबरोबर ते इतरही गोष्टींचा उल्लेख करतात...contd..<br />त्याचबरोबर ते इतरही गोष्टींचा उल्लेख करतात, जसं नको तिकडे सर्वधर्म सहिष्णुता कशाप्रकारे हिंदू राजांना महाग पडली वगैरे! अन हे उदाहरण तर सर्वांनाच ठाऊक आहे, की घौरीनं पृथ्वीराजावर १७ आक्रमणं केली अन पृथ्वीराजानं त्याला १७ वेळा हरवून पकडून बाईज्जत सोडलं. पण अठराव्यांदा घौरी जिंकला अन त्यानं मात्र पृथ्वीराजाचे डोळे काढून त्याला मारलं. त्याचप्रमाणे सोमनाथाचं मंदिर अनेक वेळा लुटलं गेलं, पण हिंदू राजाने नंतर तिथे मशीद बांधण्याची परवानगी दिली अन नको तिकडे मनाचा मोठेपणा दाखवून शेवट ओढवून घेतला. हा मोठा फरक सावरकर इथे चर्चितात.<br />सावरकर त्या उतार्यामध्ये १६०० च्या शतकातील रणनीतीची चर्चा करतात. ज्या काळामध्ये बहुपत्नीत्व कुठल्याच धर्मामध्ये निषिद्ध नव्हतं. त्या चर्चेदरम्यान ते म्हणतात, की ह्या परकीय आक्रमकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं असतं तर त्यांना पुन्हा असले प्रकार करण्याची हिंमत झाली नसती. <br />त्यांच्या 'जशास तसे' ह्या वाक्प्रयोगामध्ये दुर्दैवाने बलात्काराचाही समावेश होतो अन हे माझ्या आधुनिक मनाला निश्चितच खटकतं. पण त्यांनी मांडलेले सद्गुणीपणाचे मुद्दे निश्चितच मनाला पटणारे आहेत. हिंदू राजांची तत्व इतकी नैतिकतेच्या पातळीवर उच्च होती की अत्यंत खालच्या पातळीवरून लढणारे मोगल बरंच नुकसान करू शकले. <br />त्याचबरोबर ते बाजीरावाच्या मस्तानीपासून झालेल्या मुलाला हिंदू करू न देणार्या ब्राहणांवरही टीका करतात. इथे ते मोगलांच्या अन इस्लामी आक्रमकांच्या युद्धनीतीला देता येऊ शकणार्या उत्तरांबद्दल चर्चा करतात अन कुठे काय चुकलं ह्याची कारणमीमांसा करतात. <br />त्यांच्या त्या उतार्याचा इथे फार उहापोह करणं शक्य नाही अन मला ह्यापुढे स्पष्टीकरण द्यायचं नाही. पण बरेचदा, शेंडा-बुडखा न देता जी विधानं चिकटवली जातात ते दिशाभूल करणारं ठरतं.<br />आणि सौदी अरेबिया अन हिटलरची सावरकरांशी तुलना करणं हे चुकीचं ठरेल, कारण पहिली गोष्ट म्हणजे सौदीचे नियम अन हिटलरचे नियम ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. शरिया अन वंशश्रेष्ठता ह्यामध्येदेखील फरक आहे. अन त्याहीपुढे जाऊन 'आंख के बदले आंख' हा जो शरिया कायद्यातील नियम आहे, त्याची तुलना मुस्लिम आक्रमकांवर परतून आक्रमण करण्याच्या रणनीतीशी करणं मला योग्य वाटत नाही. आणि त्यातून सावरकर १६०० च्या शतकात अवलंबलेल्या युद्धतीनीबद्दल बोलतात अन त्याच नीती तत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्याची कुठेही वकिली करत नाहीत.<br />जगात कोणीही परिपूर्ण नाही.त्यामुळे काळाच्या कसोटीवर आपणच उतरायचे ..इतरांचे विचार उतरोत किंवा न उतरोत. ..<br />हे जरी सत्य असलं अन मला पूर्णपणे पटत असलं, तरी बेसिकली सावरकरांचे अन अतातुर्कचे विचार मला हेच करायला सांगतात. त्यामुळे मी त्यांना माझा रोलमॉडेल मानू शकतो.<br />अन गांधींचे विचार मला न पटणार्या बर्याच गोष्टी सांगतात, तत्कारणात मला त्या मान्य करता येत नाहीत.<br />हिंसा वैचारिक नसते..ह्याबद्दल गांधींची कदाचित वेगळी मते असू शकतात. कारण गांधींची प्रत्येक गोष्ट अगदी ब्रह्मचर्यदेखील वैचारिक पातळीवर होतं. <br />>>वैचारिक असते ती विचारांची देवाणघेवाण. . हे मात्र पटलं.<br />अन ह्या देवाणघेवाणीतून बरंच काही नवं शिकायला मिळालं, ह्याचा आनंद वाटतो.<br />माझ्या मते ह्यापलिकडे ह्या विषयावर इथे चर्चा न करणं सयुक्तिक ठरेल. तरी तुम्हाला चर्चा करायची असेल अन तुम्हाला तुमची ओळख द्यायची इच्छा असेल तर तुम्ही मला थेट इमेल करू शकता. माझा इमेल पत्ता माझ्या प्रोफाईलपेजवर मिळू शकतो.<br />एव्हढा वेळ काढल्याबद्दल धन्यवाद! भेट देत राहा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-8160457837011379112011-02-01T12:38:54.290-08:002011-02-01T12:38:54.290-08:00contd..
>>सावरकरांनी मुस्लिमांना देशद्रोही ठ...contd..<br />>>सावरकरांनी मुस्लिमांना देशद्रोही ठरवले, हे वक्तव्य जेव्हा 'याल तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय' ह्या सावरकरांच्या उक्तीशेजारी ठेवलं जातं, तेव्हा त्याचं तेज थोडं कमी होतं.<br />दुसरी गोष्ट जर देश वगैरे संकल्पनांचं सामान्यांना काहीच पडलेलं नसतं, तर पहिल्याप्रथम पाकिस्तान बनला नसता. त्यापुढे, जर जिनांनी मुसलमानांना चिथवलं असं म्हणावं, तर पाकिस्तानचा प्रस्ताव, जिनांनी पाकिस्तानसाठी वकिली करायच्या आधीच अस्तित्वात आलेला असल्याचं दिसतं. अन जर खरंच सामान्यांसाठी देश इतकी नगण्य गोष्ट असती, तर पाकिस्तानात कराचीमध्ये आजही 'मुहाजीर कौमी मूव्हमेंट' अस्तित्वात नसती, अन तिच्या सपोर्टवर पाकिस्तानात सरकार चाललं नसतं.<br />पुढची गोष्ट म्हणजे, जर सावरकरांचं 'पुण्यभू अन पितृभू'चं इंटरप्रिटेशन लोकांना इतकंच खटकतं, तर गांधींना 'मुसलमानांना मुख्य प्रवाहातील स्वातंत्र्यचळवळीत आणण्यासाठी' 'खिलाफत चळवळ' सुरू करण्याची गरज का पडते, ह्याचा परामर्श घेणं आवश्यक ठरतं.<br />कारण, जर देशातल्या मुसलमानांसाठी देशाच्या स्वातंत्र्यचळवळीपेक्षा, तुर्कस्तानातल्या खलिफाला पदच्युत केल्याचा (जे एका धार्मिक पण डोळस पुरोगामी मुस्लिम नेत्यानंच-अतातुर्कनं-केलं होतं) निषेध करणं जास्त महत्वाचं वाटतं असं जर खुद्द देशाच्या स्वातंत्र्यचळवळीचे तत्कालीन सर्वेसर्वा गांधींनाच वाटत असेल, तर सावरकरांच्या सिद्धांताकडे वेगळ्या नजरेनं पाहणं आवश्यक ठरत नाही का?<br />बाकी दोन वेळच्या जेवणाची भ्रांतवाला सिद्धांत मनाला पटून जातो हो, पण जेव्हा फाळणीनंतरच्या हिंसाचाराबद्दल वाचलेल्या गोष्टी अन जगभरात ठिकठिकाणी चाललेली थैमानं दिसतात तेव्हा माणसाला पोटाच्या भुकेपेक्षासुद्धा जास्त कधीकधी काहीतरी महत्वाचं असतं, ह्याचा विश्वास पटतो. <br />>>सावरकरांनी मुस्लिमांविषयी आकस बाळगला<br />हे पूर्णपणे ढोबळ वक्तव्य आहे. त्यांच्या आकस बाळगण्याची कारणामीमांसा जाणून घेण्यासाठी 'सहा सोनेरी पाने' वाचावी लागतात अन अंदमानच्या जेलमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या घटना जाणून घ्याव्या लागतात.<br />अंदमानच्या जेलमध्येही सावरकरांनी मुस्लिम कैदी वॉर्डन्सचे पक्षपाती निर्णय पाहिले होते. अन त्यांचं मुद्दाम त्रास देणं अन ब्रिटीशांकडून मिळणारी अग्रक्रमाची वागणूकही पाहिली होती.<br />त्याहीपुढे ऐतिहासिक कालखंडातही भारतवर्षावर झालेलं कुठलंही इस्लामी आक्रमण रामराज्य देणारं नव्हतंच. उलट सर्वप्रकारची संपत्ती लुटून नेणारं होतं. त्यामुळे सावरकरांचा सोनेरी पानेमधला दिसणारा 'आकस' त्या सर्व गोष्टींतून येतो.<br />पण पुरोगामी मुस्लिमांबद्दल सावरकरांची तक्रार नसल्याचं त्यांच्या अतातुर्कची स्तुती करणार्या निबंधातून जाणवतं. अन 'याल तर तुमच्याबरोबर अन नाही तर तुमच्याशिवाय' ह्यामध्येही पराकोटीचा आकस दृष्टीस पडत नाही.<br /><br />पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही जो एका इंटरनेट फोरममधला मजकूर चिकटवला आहे. त्याचा उगम सहा सोनेरी पाने मध्ये आहे. अन तुम्ही जो मजकूर पेस्ट केला आहे, तो एका माणसाचं त्यावरचं मत आहे, ते मूळ उतार्याचं भाषांतरही नाही.<br />सावरकर तिथे मुस्लिम आक्रमकांच्या रणनीतीचा ऊहापोह करून म्हणतात की मुस्लिम आक्रमकांनी हिंदूचा परस्त्रीदाक्षिण्याचा गुण हेरला होता. अन त्याचा पुरेपूर फायदा उचलून कधी मुस्लिम स्त्रियांना मानवी ढाल म्हणून वापरून तर कधी हेर म्हणून वापरून त्यांनी भारतीय राजांचं नुकसान केलं. जे पूर्णतया सत्य आहे.<br />contd..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-83404098596085173382011-02-01T12:35:27.425-08:002011-02-01T12:35:27.425-08:00contd..
आणि हा कायदा केवळ महाराष्ट्र, गुजरात अन थो...contd..<br />आणि हा कायदा केवळ महाराष्ट्र, गुजरात अन थोड्याफार प्रमाणात कर्नाटकातच नीट राबवला गेल्याचं दिसतं. कारण उत्तरेकडे आजही जमीनदारांच्या अत्याचारांच्या बातम्या दिवसाआड येत असतात. अन बंगाली जमिनदारांच्या गोष्टीवर देवदाससारख्या कलाकृती निघतात. त्यामुळे अख्ख्या देशात फक्त महाराष्ट्रीय ब्राह्मणांकडे बोट दाखवण्याचं कारण मला कळत नाहीत. बहुतेक ते सॉफ्ट टार्गेट आहेत (देशातल्या कुठल्याही राज्याच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार सर्वांत कमी ब्राह्मण महाराष्ट्रात आहेत आणि तेही उपरोल्लिखित कारणाने विखुरलेले, त्यामुळे त्यांच्या मतांचा कुणालाही उपयोग नाही, पण त्यांना कॉमन एनिमी बनवून बरीच टकली गोळा करता येतात, पुन्हा त्यांच्याकडून संघटित विरोधही अपेक्षित नाही) म्हणून की त्यांच्या नावाखाली नथुराम, टिळक अन सावरकरांना एकाच ओळीत उभं करून झोडायला सोपं जातं म्हणून!<br />अन हो उत्तरेकडे बहुतांश जमीनदार ठाकूर(क्षत्रिय) होते/आहेत अन बंगालमध्ये देखील. तेव्हा ब्राह्मणांमध्ये अस्वस्थता असं वाक्य सोडणं थोडं बेजबाबदार वाटतं!<br />असो मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे, की जमीन सुधारणा कायदा नीट राबवलाच गेला नाही. तेव्हा त्यामध्ये खालच्या पातळीवरच काही त्रुटी असणं सहज शक्य आहे. त्यामुळेच खोती बिलातदेखील त्रुटी असण्याच्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर टिळकांचा विरोध असू शकतो. अर्थात टिळकांचा विरोध का होता, हे संबंधित कागदपत्रांच्या अभ्यासाशिवाय कळणं अशक्य आहे. टिळक ब्राह्मण होते, म्हणून त्यांनी विरोध केला, हे वक्तव्य बालिशपणाचं वाटतं (तुम्ही ते करत आहात असं मला बिलकुल म्हणायचं नाही.)<br />तुमचा मुद्दा गांधींच्या विचारपरिवर्तनाचा होता हे मला लक्षात आहे. पण तुमची काही वाक्य मला स्पष्ट करावीशी वाटली म्हणून केली.<br />बाकी, गांधींचं हे मतपरिवर्तन झालेलं मला ठाऊक नव्हतं. पण मुळात ज्या गोष्टींचा भारताला(मला अन माझ्या समविचारी लोकांना) त्रास होतोय, त्या बाबतींत त्यांचं मतपरिवर्तन झालेलं नजरेस आलं नाही, म्हणून मी तसं म्हटलं होतं.<br />तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद!<br />2) >>सर्वप्रथम सरसकट सगळी पापं पेशवाईच्या माथी मारणं अन त्यासाठी आगरकरांच्या एका वाक्याचा उपयोग करणं मला परिपूर्ण वाटत नाही. कारण, पेशवाईनं देशांमध्ये चालीरिती आणल्या किंवा रूढीपरंपरा आणल्या हे माझ्या ऐकीवात नाही अन दुसरं म्हणजे पेशवाईत झालेले अगणित अत्याचार कोणते हे जर तुम्ही सांगितलं असतंत तर अधिक चांगलं झालं असतं, कारण मी मोगलाईत झालेले अनन्वित अत्याचार वाचले आहेत.<br />दुसरं म्हणजे 'ब्रिटीशांच्या मदतीनं सामाजिक सुधार करून घ्यावेत अन एकदा वाईट चालीरिती संपल्या..' हे वाक्य फारच आशावादी वाटतं.<br />कारण पहिलं म्हणजे ब्रिटीश काही आपलं देणं लागत नव्हते. अन दुसरं म्हणजे त्यांना आपल्या सामाजिक सुधारणांमध्ये काडीचा रस नव्हता. त्यांना पहिल्या महायुद्धाने खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था मार्गावर आणायची होती. अन त्यामुळे त्यांनी दोनचार त्यांच्या दृष्टीने निरुपद्रवी बिलं पासही केली असतील. पण ती बिलं स्वकीय सरकारने पास केली नसती असं कोण म्हणतं?<br />अन दुसरं म्हणजे बिलं पास करून सामाजिक सुधारणा होत नसतात, त्यासाठी समाजाचा रोष पत्करून सामाजिक मंथन घडवावं लागतं. अन ते उत्क्रांतीच्या नियमानुसार घडतंच. अहो बिलं अन कायदे स्वातंत्र्यानंतरही अमाप झाले. काय फरक पडला तत्काळ? ब्रिटीश लोक काय करणार होते त्याहून जास्त?<br />असो. ह्या बाबतीतही तुमची मतं ठाम असतीलच. त्यामुळे मला वाद वाढवायचा नाही.<br />आता टिळकांबद्दल,<br />>- टिळकांनी " काँग्रेस" च्या अधिवेशांच्या बाजूस सामाजिक परिषदेचे अधिवेशन भरवण्यास विरोध केला, आणि शेवटी तर ते स्टेज जाळले.<br />स्टेज टिळकांनी जाळलं किंवा जाळवलं, हे मला खरंच ठाऊक नव्हतं. एखादं सपोर्टिंग कागदपत्र असेल तर सांगता का? मला खरंच जाणून घ्यायला आवडेल.<br />- मुलींचे लग्नाचे वय १० वरून १४ ( कदाचित १६ असेल, नीट आठवत नाही) ते करणाऱ्या प्रस्तावास विरोध केला .<br />ह्म्म.. ह्या प्रस्तावाला विरोध करण्यामागचं कारण मलाही कळत नाही. पण मला ह्या विरोधाचीही अधिकृत नोंद पाहायला आवडेल. अन हा प्रस्ताव कुठे चर्चेस होता अन काय चर्चा झाली ह्याचीही नोंद असली तर उत्तमच.<br />- आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे खोती बिलाला विरोध केला.<br />खोती बिलाबद्दल मी वरच बोललो.<br />बाकी काळाच्यापुढे टिळक नसतील पण काळाच्या मागे होते हे मी तरी उपरोल्लेखित कुठल्याही मुद्द्यावरून (लग्नाचं वय सोडता) म्हणू शकत नाही. आणि गंमतशीर योगायोग पाहा. आजच आपल्या देशात 'कन्सेन्शुअल सेक्स' साठीची मान्य वयोमर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव सादर झालाय. :D<br />असो. थोडक्यात, आपलं इथेही एकमत होण्याच्या शक्यता कमीच दिसतात.<br />contd..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-73217062167761633662011-02-01T12:34:32.162-08:002011-02-01T12:34:32.162-08:00१) >> लोकांना त्यांचं चांगलं वाईट कळत असतं, ...१) >> लोकांना त्यांचं चांगलं वाईट कळत असतं, तर 'नेता' हा प्रकार अस्तित्वात आला नसता. लोकांना वैयक्तिक चांगलं वाईट कळतं असं एकवेळ म्हणू शकतो आपण, पण समूहाचं चांगलं वाईट बघण्यासाठीच 'नेता' निवडला जातो. अन माणसं नेत्याचं तोवर डोळे झाकून ऐकतात जोवर त्याचे विचार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी त्रासदायक ठरत नाहीत ( हे वाक्य फक्त अतिशय खालच्या पातळीवरच्या अनुयायांबद्दल आहे, जीवनं उधळून टाकणारे अनुयायीही असतातच). पण लोकांना सामूहिक भल्याबुर्याची जाण असती तर सगळेच नेते झाले असते ना!<br />असो. तुमचा विश्वास आहे म्हटल्यावर वादाचा मुद्दा उरत नाही.<br /><br />>>इथे तुम्ही जी आंबेडकरांची वाक्य चिकटवली आहेत, ती मला 'वैचारिक पातळीवर' विरोध करणारी वाटत नाहीत. ती आरोप करणारी किंवा जास्तीत जास्त टीका करणारी वाटतात. आणि जरी गांधींच्या विचारांचा अन त्यांच्या एकंदर पॉलिसीजचा 'वैचारिक पातळीवरचा' विरोध आंबेडकरांनी लिहिलेला असला तर तो अद्याप माझ्या वाचनात नाही. कारण मी एकंदरच आंबेडकरांचं साहित्य फारसं वाचलेलं नाही.<br />आणि मला सावरकरच एकमेव वाटण्याचं दुसरं कारण हे असावं, की आजवर देशातल्या सर्व प्रमुख(?) माध्यमांनी अन विचारवंतांनी नेहमी गांधींच्या विचारविरोधात सावरकरांचीच चर्चा केलेली आहे. कारण बहुतेक सावरकर हे त्यांच्या हिंदुत्ववादी ख्यातीमुळे सॉफ्ट टार्गेट ठरतात, उलट बाबासाहेबांना गांधीविरोधी म्हणून प्रोजेक्ट करणं कदाचित राजकीय सोयीचं नाही. <br />आणि सावरकरांना 'Hero Worship' करायचा जर प्रयत्न कुठे होत असेल, तर त्याला पहिला खुद्द सावरकरांचाच आक्षेप राहिल. त्यामुळे तुम्ही खर्या सावरकरवाद्यांपासून खुशाल अपेक्षा ठेवू शकता, त्या निश्चितच पूर्ण होतील ह्याची मी ग्वाही देतो.<br />>> नथूराम अन घरे जाळणारी माणसे ह्यांच्या मानसिकतेचा तौलनिक अभ्यास करायला घेतला तर कदाचित पी.एच.डी. सुद्धा करता येईल, त्यामुळे ते मी टाळतो. फक्त एव्हढेच म्हणेन. की समूहाचं मानसशास्त्र आणि एका विशिष्ट हेतूने प्रचंड भारावून जाऊन पण पूर्ण शुद्धीवर राहून केलेलं कृत्य ह्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. जरी ती कृती वरकरणी कितीही सारखे परिणाम दाखवत असली तरी.<br />त्यापुढे नथूरामना हीन दाखवण्यासाठी जो 'निशस्त्र व्यक्ती' वगैरेचा वापर झाला आहे, तो शब्दपांडित्याला धरून आहे.<br />अन जेव्हा अत्याधिक अहिंसा मान्य नाही अन अहिंसा चूक होते असं नाही, ही दोन्ही वाक्ये एकाच ओळीत येतात, तेव्हा खरोखर वादासाठी मुद्दा उरत नाही. कारण माझंही तेच मत आहे. बहुतेक आपल्यात मतभिन्नता ऍक्सेप्टेबल अहिंसेच्या पातळीवर असेल. पण ती तशीच राहिलेली बरी!<br />३) >>१९४२ च्या आंदोलनांत झालेली घटना मला वाचल्याचं आठवत नाही. पण तुम्ही म्हणता त्याअर्थी नक्कीच असेल. पण मग 'डायरेक्ट ऍक्शन डे' च्या दिवशी जीनांचे अनुयायी हिंसेचा नंगानाच करताना आपल्या अनुयायांना अहिंसेचं पालन करण्यास सांगण्यामध्ये काय अर्थ होता? अन जिनांनी डायरेक्ट ऍक्शन डे थांबवावा म्हणून उपोषणाला बसून काय साध्य झालं?<br />जमीन सुधारणेचा मुद्दा नेहमीच निघतो अन त्यावर माझं असं म्हणणं आहे. की होय महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या हातात जमिनी होत्या. वतनं होती. ती यथोचितपणे काढून घेऊन कुळांच्या हाती दिली गेली. अनेक ब्राह्मण देशोधडीला लागून शहरात आले अन शिक्षण असल्याकारणाने नोकर्या करून पुन्हा संसाराची गाडी चालवू लागले. अन उरलेसुरले ब्राह्मण नथुराम अन गांधी अनुयायां(!)च्या कृपेने देशोधडीला लागले. पण मग जे अजूनही जमीनदार अस्तित्वात आहेत (जर तुम्ही कुणीच नाहीत म्हणालात तर प्रश्नच संपला, मी शांत झोपेन आज), ते कोण आहेत मग? जमिनी फक्त ब्राह्मणांकडेच होत्या का? अजूनही खेड्यांमध्ये घडणार्या घटना कुठे अंगुलीनिर्देश करतात? <br />contd..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-49221767357083128702011-02-01T12:32:33.090-08:002011-02-01T12:32:33.090-08:00प्रसाद,
खूप धन्यवाद भाऊ! पोस्ट टाकतानाच विचारमंथना...प्रसाद,<br />खूप धन्यवाद भाऊ! पोस्ट टाकतानाच विचारमंथनाची अपेक्षा होती. पण अपेक्षेपेक्षा थोडं जास्तच झालं! :D<br />भेट देत राहा! असाच लोभ राहू दे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28486376123430360252011-02-01T10:41:48.504-08:002011-02-01T10:41:48.504-08:00नमस्कार !
मला तुम्ही माहित नाहीत .. आणि मी हि तुम...नमस्कार !<br /><br />मला तुम्ही माहित नाहीत .. आणि मी हि तुम्हाला ! योगा योगाने प्रथमच तुमचा ब्लॉग पाहिलाय आज...हा लेख वाचला.. संतुलित आहे बऱ्यापैकी !म्हणलं थोडं शेअर करावं ! खरंच हेतू फक्त शेअर करायचाच आहे! हे वाचून झाल्यावर वाटलं , तुम्हाला किंवा कोणालाही .. गांधी 'कळले' का ?? मलाही नाही ! पण एक गोष्ट .. गांधींनी आयुष्यात प्रामाणिक पणा दाखविला....तुम्ही आम्ही आहोत का तेवढे ? नाही..पण त्यांना तुमच्या आमच्या सारख्या 'माणसांच्या' कसोटीवर/गुणांवरच तपासायची प्रलोभनं सुटत नाहीत ! त्यांनी दलितांचे संडास साफ करण्या इतपत समर्पण दाखवले.. त्यांना श्रेय देता देता हळूच/उघडपणे त्यांच्या चुकांवर बोटं ठेवायची .. जास्तवेळ. त्यांना 'समजून' घेण्याची ताकद आपल्यात नाही हे सतत दाखवून दिलं जातं ...पूर्वीही, आजही आणि पुढेही होईल असं ! १०० % कोण आहे या जगात ? बरं , सावरकर , भगतसिंग, सुभाष बाबू .. यांच्या मार्गाने जर स्वातंत्र्य मिळालं असतं कदाचीत तर .. विविधतेत एकता असं काही आज उरलं असतं का ? खरंच काय उरलं असतं ? सहन करायला 'खरे गट्स' लागत नाहीत ? गांधीनी ते दाखवले ! गांधींना रेट करायचं तर तेवढी सिद्ध केलेली बुद्धी हवी ..बुद्धी साठी जगाला माहित असलेलं नाव आईनस्टाईन आहे, त्यांनी गांधीन बद्दल काढलेले उद्गार आपण जाणतोच ! तरीही..! गांधीनी भविष्या साठी अभूत पूर्व मार्ग दाखवला नाही ?मानवाचे अस्तित्व हा भूमितीचा प्रश्न निश्चितच नाही.. सर्वोत्तम असा एकंच मार्ग असतो ! बाकी सगळे वळसे, वेळ काढू पणा !एका हायड्रोजन/न्यूट्रोन बॉम्ब वर संपविण्यासाठी हे सगळं उभं आहे ? आणि काळाला अनुसरून वागले नाहीत म्हणजे काय हो ? गुण / तत्व हे मेटा फिजिकल नाहीत ? मग कशासाठी आणि कुणी कडे आणि कोणता 'बदल' 'बदल' म्हणुन आपण दिवा स्वप्न पाहतो ? आपल्या मतावर ठाम राहाणं म्हणजे हट्टी पणा ?..सगळ्याना सारखंच दिसतं पुढचं ?.. असं कसं होईल...समाज रेडी नव्हता पूर्वी आणि पुढेही कधी होईल असं आपलं मत आहे ? गरोदर स्त्री ज्या यातानांमधून जाते त्याबद्दल पुरुषांनी बोलण्यात काय तथ्य आहे ? गांधींना तर एका नव्या समाजाला जन्म द्यायचा होता .. ते त्यांचं मुल होतं.. ते मुल जिवंत राहिलं नाही..!यात त्यांनी केलेल्या प्रेमाचा दोष ? बाकी तुमच्या ब्लॉग ला ३६५ दिवस झाल्या बद्दल तुम्हाला शुभेच्छा ! आभारी ! <br />- आशिषAshish Kulkarnihttps://www.blogger.com/profile/07550171388958156349noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-69111452562945439192011-02-01T09:02:38.289-08:002011-02-01T09:02:38.289-08:00विद्याधर, मला आपलं वाटतं कि सध्या देशाला चर्चेची न...विद्याधर, मला आपलं वाटतं कि सध्या देशाला चर्चेची नाही तर कार्याची गरज आहे....<br />कदाचित आपला देश आपल्याकडे त्याचीच भीक मागत असेल...<br />कधी कळणार हे आपल्याला? अजून कोण, कधी आणि किती चुकायला हवे आहे?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-72920368342065006992011-02-01T06:22:52.759-08:002011-02-01T06:22:52.759-08:00बाबा, अप्रतिम पोस्ट. आणि वर दिलेली सविस्तर प्रतिक्...बाबा, अप्रतिम पोस्ट. आणि वर दिलेली सविस्तर प्रतिक्रिया माझ्या मनातले प्रश्नांना उत्तर देऊन गेली...<br /><br />मला माहीत होत की तुझ्या ब्लॉगला वर्ष पूर्ण होतय, सो अशीच एक मस्त विचारमंथन करणारी पोस्ट अपेक्षित होती आणि हो आत्ता कळला तु पोस्ट पाडायचा सपाटा का लावला होतास ते :)<br />खूप खूप शुभेच्छा भाई. असाच लिहत रहा. <br /><br />(सॉरी उशिरा प्रतिक्रिया देतोय, पण सध्या गायबच आहे नेटावरुन काही दिवस..लवकरच परत येइन)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-23132589721132173772011-02-01T05:28:09.431-08:002011-02-01T05:28:09.431-08:00नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याच...नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल). +1<br /><br />n congratess :)विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-57628547368254280142011-02-01T03:52:12.323-08:002011-02-01T03:52:12.323-08:00अभिनंदन!!
लेख आवडला आणि तुमच्या व Anonymous च्या...अभिनंदन!!<br />लेख आवडला आणि तुमच्या व Anonymous च्या प्रतिक्रियांमधूनही बरीचशी माहिती मिळाली.<br />तुमचे लेख वाचनीय आहेत. मी प्रथमच भेट दिली पण लिखाण आवडले.<br /><br />लिहते रहो.Anonymousnoreply@blogger.com