मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला अगदी चौथी-पाचवीपासूनच काहीतरी लिहावं आणि लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटायचं. कविता वगैरेसुद्धा पाडायचा प्रयत्न मी अगदी लहान वयात केला होता. त्या कवितेला फारसा अर्थ नव्हता हा भाग अलाहिदा, पण लेखक किंवा कवी ह्या शब्दांबद्दल फार आकर्षण वाटायचं. त्याभोवती एक अनामिक ग्लॅमर असल्यागत आणि ते आपण बनावं असं वाटायचं. आता वाटून कुणी लेखक होत नसतो, पण वाटायचं हे महत्वाचं.
तर अशी सुरूवात झाल्यावर माझी हौस मुरत गेली नसती तरच नवल. मी चांगलाच लिहिता झालो. मुख्यत्वेकरून कथा लिहायचो, पद्य मनुष्य मी कधीच नव्हतो आणि हे सत्य मी फार पूर्वी मान्य केलं. एकदा पाय फ्रॅक्चर झाल्यावर मी प्लॅस्टरमध्ये वीस दिवस पडून होतो, तेव्हा एक रेल्वेकादंबरीस्टाईल ऍक्शन दीर्घकथादेखील लिहून काढली होती. एकदा एअरपोर्टवर विमानाची वाट पाहताना मी ई-तिकिटाच्या प्रिंटआऊटच्यामागे कथा लिहिली होती. घरातल्या अडगळींमध्ये आवराआवरी करताना आजही आईला मी कथा लिहिलेले कागदाचे कपटे अधूनमधून सापडतात. आणि हे सगळं 'मराठी ब्लॉग' ह्या माध्यमाची ओळख होण्यापूर्वी. त्याआधी कॉलेजात असताना मित्राच्या नादानं इंग्लिश ब्लॉग लिहायचो. आणि ते अत्यंत बालिश आणि माझ्या अत्यंत मर्यादित महाविद्यालयीन वर्तुळापर्यंतच सीमित असे ब्लॉग्ज असायचे.
तर मुद्दा हा की आजपासून अडीच वर्षांपूर्वी मराठीमध्ये ब्लॉग लिहायला सुरूवात करण्यापूर्वीदेखील मी लिहितच होतो आणि जेव्हा मी ब्लॉगवर काही लिहित नसतो, तेव्हाही कागदांवर मी लिहितच असतो. पण ब्लॉग हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे.
आपण सर्वप्रथम ब्लॉग म्हणजे काय ते पाहू. Blog म्हणजे Weblog ह्या शब्दाचं छोटं, सुटसुटीत रूप आहे. Web वर ठेवला जाणारा Log अर्थात ढोबळमानानं ऑनलाईन दैनंदिनी. पण ब्लॉग तिथपर्यंतच मर्यादित राहिला नाही. सुरूवातीला इंग्रजीनं आणि नंतर इतरही अनेक ज्ञानभाषांमध्ये समृद्ध असे ब्लॉग्ज जगभरात तयार झाले. ब्लॉगचा वापर नुसती दैनंदिनी म्हणून करणारे जसे लोक आहेत, तसेच ब्लॉग म्हणजे ऑनलाईन ग्रंथच बनवणारेही अनेक महाभाग आहेत. आणि इतका लवचिकपणा हीच ब्लॉगची मुख्य खासियत. थोडक्यात ब्लॉग म्हणजे महाजालावरचा एक असा कोपरा जो वेळ पडल्यास सगळ्या जगालाही दिसू शकतो. अनेकजण असा स्वतःचा कोपरा केवळ मर्यादित वर्तुळापर्यंतच सीमित ठेवतात अर्थात त्याही बाबतीत ब्लॉग हे लवचिक माध्यम आहे. पण ज्याप्रकारे इंटरनेटचा प्रसार होऊ लागला, त्यामुळे ब्लॉगिंग हे संवादाचं एक माध्यम बनू लागलं. अगदी राज्यक्रांत्यांमध्येची ब्लॉगिंगनं बरीच महत्वाची भूमिका वठवली. अर्थात ब्लॉगिंग ही एक भाषा बनली. आणि मग ज्याप्रकारे प्रत्येक भाषेच्या बाबत होतं, त्याप्रमाणेच ब्लॉगिंगबाबतही गुणात्मक आणि संख्यात्मक तुलनांना सुरूवात झाली. इंग्रजी, फ्रेंच, चायनीज, रशियन, स्पॅनिश इत्यादी मोठा सुशिक्षित आणि इंटरनेट उपलब्ध असलेला वर्ग असणार्या भाषांमध्ये अनेक ब्लॉग्ज निर्माण झाले. ह्या ब्लॉगिंग जगतांमध्येदेखील निश्चितच अशा प्रकारची ओरड कोणत्या न कोणत्या कालावधीमध्ये झाली असणारच, पण मी तितका शोध घेतला नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण सध्या, सध्या कशाला, मी जितके दिवस ब्लॉगिंग करतोय तितके दिवस मी 'मराठी ब्लॉग्जचा दर्जा उंचावत नसल्याची खंत' व्यक्त करणारे उसासे वाचतोय. गंमतीचा भाग असा की की लहानपणापासून मी 'मराठी भाषा मरणासन्न आहे' असलेही उसासे ऐकत आलोय आणि त्या उसाशांना काहीही अर्थ नसतो हे मला नेहमीच तितक्याच प्रकर्षाने वाटत आलंय.
आता आपण मराठी ब्लॉगिंगबद्दलच्या काही ठळक काळज्या पाहू -
१. मराठीत विषयांचं वैविध्य नाही.
-मी स्वतः अत्यंत थोडेसेच ब्लॉग्ज पाहिले आहेत आणि माझ्या अत्यंत तुटपुंज्या परिघामध्येही एक फोटोग्राफीचा ब्लॉग, भरपूर ट्रेकिंगचे ब्लॉग्ज, ललितलेखनाचे विपुल ब्लॉग्ज, कथा/लघुकथा, कविता, तांत्रिक बाबींशी संबंधित ब्लॉग्ज, पाककला, चित्रकला, हस्तकला, समाजकार्यातले अनुभव, प्रवासवर्णनं, रामायण, महाभारत इत्यादी इत्यादी ब्लॉग्ज मी पाहिलेत. मी स्वतः अत्यंत छोटा अन सामान्य मनुष्य असल्यानं मला जास्त विषयांमध्ये गती नाही त्यामुळे मी फारसे वैविध्यपूर्ण ब्लॉग्ज शोधले नाहीत. पण न शोधताही जर मला इतके मिळाले असतील, तर बाकीचेही काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, एखादा ब्लॉग हा एकाच विषयाला वाहिलेला असावा असा एक टीकाकारांचा सार्वत्रिक अट्टाहास मला जाणवतो, तो अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीनं एका विषयासाठी एकच ब्लॉग लिहिला तरच तो गुणात्मकदृष्ट्या वरचढ का गणाला जावा? जर एखाद्यानं त्याची फोटोग्राफी, चित्रकला, हस्तकला, तांत्रिक बाबी आणि ललितलेखन एकाच ब्लॉगवर केलं तर लगेच त्याला ललित ब्लॉगर म्हणून हिणवायचं? हे म्हणजे 'लघुत्तम सामायिक विभाजक' काढण्यासारखं आहे आणि तेदेखील चुकीचा. कारण कुठल्याही प्रकारचं लेखन कमी दर्जाचं जास्त दर्जाचं असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे. ललित लिहिलं की वाईट, विवेचन केलं की चांगलं, इंग्रजीमिश्रित बोलीभाषा वापरली की वाईट, जडबंबाळ अललंकारिक लिहिलं की चांगलं ही वर्गवारी कशासाठी?
ज्याप्रमाणे कुठलाही एक मनुष्य दुसर्याप्रमाणे नसतो, त्याप्रमाणे कुठलीही एक अभिव्यक्ती दुसर्या अभिव्यक्तीसारखी नसते. त्यामुळे एकाच शाळेत, एकाच बाकावर एकाच तासाला बसणारी दोन मुलं त्या तासात घडलेल्या घटनांचं संपूर्ण वेगळं वर्णन करतील. ते आपलं 'एकच कुत्रा आहे म्हणून आमचा निबंध सारखा आहे' असल्या बालिश जोकसारखं कधीच नसतं. तस्मात एकाच धाटणीचे ब्लॉग असं म्हणून जे एक जनरलायझेशन केलं जातं ते मला पूर्णपणे आक्षेपार्ह वाटतं.
२. मराठी ब्लॉगिंगमध्ये रोजच्या घडामोडींबद्दल किंवा फक्त स्वतःच्याच परिघातल्या अनुभवांबद्दल अत्यंत ट्रिव्हियल लिहिणार्या ब्लॉग्जचाच भरणा जास्त आहे. थोडक्यात ब्लॉग ह्या माध्यमात 'नवा विचार' येत नाही.
-मी कुणी मोठा लेखक नाही की लोकप्रिय ब्लॉगर नाही की कॉम्प्युटर आहे आणि मराठी टंकलेखन जमतंय म्हणून चार ओळी खरडणारा हौशी मनुष्यही नाही, पण मी ह्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे. कारण कधी मी लेखक म्हणून लिहितो, तर कधी मनातलंच ललितलेखनाच्या माध्यमातून लिहून चार समविचारी लोकांचे प्रतिसाद मिळावेत म्हणून लिहितो, तर कधी निव्वळ हातात लॅपटॉप आहे म्हणून लिहितो. आणि हो, मीसुद्धा वाचलेली पुस्तकं, पाहिलेला सिनेमा किंवा मस्त जमलेली ट्रीप ह्यांवर ब्लॉगपोस्ट लिहितो. पण जेव्हा 'मराठी ब्लॉगिंगमध्ये नवा विचार येत नाही' असली ओरड होते, तेव्हा मोठी मौज वाटते.
मुळात 'नवा विचार' ही किती सापेक्ष संकल्पना आहे. जी व्यक्ती फक्त स्वतःच्या घरातल्या गोष्टी ब्लॉगवर लिहिते, त्या व्यक्तीनं कथा लिहिणं हा 'नवा विचार' ठरतो. जी व्यक्ती पुस्तक परीक्षणं लिहिते, तिनं ललित लिहून पाहणं हा 'नवा विचार' ठरतो आणि जी व्यक्ति अक्षरशः डोक्यात चाललेल्या कुठल्याही विचारचक्रावर लिहिते, तिनं कविता लिहिणं हा 'नवा विचार'च नाही का?
फक्त दणदणीत शब्दप्रयोग करून वैचारिक लिहिणं म्हणजेच 'सध्याच्या विचारांपलिकडचं' होऊ शकत नाही. अर्थापलिकडला अर्थ शोधणं आणि तो शब्दांकित करणं हा निश्चितच कौतुकास्पद 'नवा विचार' ठरतो, पण फक्त तोच नवा विचार ठरतो हे आक्षेपार्ह आहे. असं लिहिणार्यानं एकदा घरात काय घडतंय, ते हलक्याफुलक्या बोलीभाषेत (मग ती इंग्रजीमिश्रित का असेना) शब्दांकित करून पाहणं, हा निश्चितच 'नवा आणि सध्याच्या विचारांपलिकडचा' विचार ठरू शकतो. किएस्लोव्स्कीचे 'थ्री कलर्स' हे तीन सिनेमे, तिन्ही संपूर्ण वेगवेगळ्या धाटणीचे. एकामध्ये डार्क ह्यूमरमध्ये दडलेला सिम्बॉलिझम, दुसर्यामध्ये कोंबून भरलेला थेट अंगावर येणारा सिम्बॉलिझम आणि तिसर्यामध्ये प्रचंड स्टाईलबाज सिम्बॉलिझम. डेकालॉगचे दहाही एपिसोड वेगवेगळ्या धाटणीचे, एकात रडायला येईल, तर दुसर्यात घृणा वाटेल, तिसर्यात थरारून जायला होईल तर चौथ्यात चेहर्यावर स्मितहास्य येईल. हा 'नवा विचार'. जर किएस्लोव्स्की फक्त सिम्बॉलिझमला कवटाळून बसला असता, तर सिम्बॉलिझमवरचे त्याचे इतके प्रयोग पाहायला कुणी थेटरात फिरकलंही नसतं किंवा त्यावर तासनतासाचा अभ्यास करून लेख पाडायचीही कुणी तसदी घेतली नसती. क्युब्रिकचा प्रत्येक सिनेमा त्याच्या मागच्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. त्याला 'सध्याच्या विचारापलिकडे जाणं' म्हणतात. जर तो प्रत्येकच सिनेमात 'अर्थामागचे अर्थ' शोधत बसला तर अभिव्यक्तीची बोंब होईल ह्याची त्याला कल्पना असते.
उद्या जर टॉड फिलिप्सनं (हँगओव्हरचा दिग्दर्शक) किएस्लोव्स्कीच्या 'द पर्गेटरी' चं काम पूर्ण करायला घेतलं तर ते त्याला जमेल का? आणि क्रिश्तॉफ पिएशिविचला जर 'हँगओव्हर ४' ची स्क्रिप्ट लिहायला सांगितली तर ती त्याला जमेल का? सांगण्याचा मुद्दा हा की अगदी एखाद्याला नसेलच 'नवा विचार' करायचा तर काय हरकत आहे? 'जरी राजहंसाचे चालणे जगी झालें या शहाणे, म्हणोनि काय कवणें चालोचि नये?'
रडगाणी गाण्यापूर्वी थोडा विचार केलेला बरा असतो.
३. मराठी लेखक, खेळाडू, गायक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील कुणीही ब्लॉगलेखनाकडे वळलेले दिसत नाहीत.
-हा एक अत्यंत योग्य मुद्दा आहे. मराठी ब्लॉगजगताला वेगळा आयाम मिळवून देण्यामध्ये ही गोष्ट मोलाची ठरू शकते. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्याकडे शाळेनंतरचं शिक्षण मराठीमध्ये उपलब्ध नाही, आणि असलं तरी ते कुणी घेत नाही कारण त्याचा वास्तविक जगात उपयोग होत नाही हे कटू सत्य आहे. थोडक्यात मराठी ही ज्ञानभाषा नाही. त्यामुळे व्यावसायिक शब्दकोष किंवा खेळामधल्या संज्ञा, शास्त्रीय संज्ञा ह्या मराठीतून एकतर असणं आणि असल्या तरी प्रथितयश किंवा त्या त्या क्षेत्रातले जाणकार, खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा व्यावसायिक व्यक्तींना ब्लॉगमधून तितक्या पातळीपर्यंत मराठीतून व्यक्त होणं अंमळ अवघडच दिसतं. पण हो, गायक, लेखक, संगीतकार किंवा अगदी व्यावसायिकही काही काही मार्गांनी निश्चितच मराठीतून व्यक्त होऊ शकतात. जुन्या काळातले उत्तम शास्त्रज्ञ उदा नारळीकर किंवा बाळ फोंडकेंसारखे उत्तम शास्त्रीय लेखक आताच्या पिढीत न होण्याची कारणमीमांसा थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत घेऊन जाते आणि ह्या विषयामध्ये लिहिण्या/बोलण्यासारखं इतकं काही आहे की माझ्या मर्यादित बुद्धीनं मी काही लिहिणं चुकीचं ठरेल.
थोडक्यात, वाट बिकट आहे, पण जर प्रथितयश लोकांनी मराठीत प्रयत्नपूर्वक लिहिलं (जसं अमिताभ बच्चन हिंदीत ब्लॉगिंग करतात), तर मराठी ब्लॉगजगताला एक नवा आयाम मिळेल ह्यात शंकाच नाही.
४.तांत्रिकदृष्ट्या मराठी ब्लॉग्जना अजून बरीच मजल गाठायची आहे.
-अजून एक योग्य मुद्दा. मराठीमध्ये टंकलेखनाची सुविधा ही तुलनेने अलिकडची घटना आहे. त्यामुळे मराठी ब्लॉगलेखनही अलिकडचंच. त्यातली बरीच मंडळी अशी आहेत जी इंग्रजी ब्लॉग्ज वाचत नाहीत किंवा लिहितही नाहीत त्यामुळे तिथल्या विविध संकल्पनांची ओळख नाही. आणि ब्लॉग लिहिणारे सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले किंवा रोजच्या रोज संगणकाशी निगडीत कामें करणारे नाहीत, त्यामध्ये गृहिणी, पेन्शनर्स आणि इतरही अनेक व्यावसायिकांचा भरणा आहे, ज्यांना ब्लॉगचा आराखडा, प्लगिन्सची व्यवस्था इत्यादी गोष्टींबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. त्यामुळे मराठी ब्लॉग्जमध्ये दिसायला सुटसुटीत आणि विविध सोयीसुविधांनी युक्त असे ब्लॉग्ज फारच कमी आहेत.
ह्या बाबतीमध्ये सुधारणेला बराच वाव आहे.पण सध्या ब्लॉगजगतात तांत्रिक बाबी स्पष्ट करून, समजावून सांगणारे अनेक ब्लॉग्ज आहेत आणि त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लवकरच चित्र पालटलेलं बघायला मिळण्यास हरकत नाही.
५. शुद्धलेखन आणि परिच्छेद, विरामचिह्ने इत्यादी लेखनविषयक तांत्रिक बाबी.
-इंग्रजी माध्यम आणि तत्सम मुद्द्यांमुळे मराठी शुद्धलेखन किंवा प्रमाण (राजमान्य) मराठी शुद्धलेखन हा एक काळजीचा विषय आहे. योग्य परिच्छेद पाडणं, र्हस्व-दीर्घ आणि स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे योग्य पद्धतीने किती जणांना जमत असेल ते सांगणं कठीण आहे. पण इथे आपल्याला अभिव्यक्ती महत्वाची आहे की सादरीकरण हा एक मुद्दा कळीचा ठरतो. भाषेचा मूळ उद्देश संवाद साधला जाणं आणि माहितीची देवाणघेवाण होणं हा आहे असं धरून चालल्यास तांत्रिक माहिती किंवा प्रवासवर्णनपर किंवा तत्सम माहितीपर ब्लॉग्जमध्ये शुद्धलेखन किंवा परिच्छेदांचा मुद्दा बाजूला ठेवता येईल, पण अर्थातच कविता किंवा कथा ह्यांमध्ये ह्याची अपेक्षा ठेवणं रास्त ठरेल.
पण एकंदरितच सरसकट सर्वत्रच शुद्धलेखन, परिच्छेद हा अट्टाहास धरून चालणं म्हणजे थोडासा अतिरेकच म्हणावा लागेल. सादरीकरण महत्वाचं आहे, पण अभिव्यक्तीचाच गळा घोटणारं सादरीकरण काय कामाचं हाही विचार व्हायला नको काय? माध्यमाला सरावल्यानंतर आपोआपच सादरीकरणात सफाई येऊ लागते. पण सादरीकरणाच्या नावाने गळे काढून नवीन अभिव्यक्ती दडपण्यात काय हशील?
मी एव्हढं सगळं पाल्हाळ लावण्याचं कारण एव्हढंच होतं, की मराठी ब्लॉगिंगमध्ये नव्या वाटा चोखाळल्या जाव्यात हा विचार मांडताना जी सद्यस्थितीबद्दल ओरड होते आहे ती अनाठायी आणि संकुचित मनोवृत्तीची आहे असं माझं ठाम मत मला मांडायचं होतं. आणि त्याचसोबत मराठी ब्लॉगिंग माझ्या नजरेतून खरोखरच कुठे आहे, ह्याचीही एक पडताळणी करायची होती. मी कुणीही तीसमारखाँ नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो, पण जे खटकलं किंवा वाटलं ते मांडण्याचं माझं स्वातंत्र्य वापरून मी हे लिहितोय.
नव्या वाटा ह्या कायमच उपलब्ध असतात, अगदी इंग्रजी ब्लॉगजगतामध्ये सर्व काही पादाक्रांत झालंय असा दावा कुणीही करणार नाही, त्यामुळे नव्या वाटा अन नव्या विचारांसाठी आत्ता लिहिणार्या किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणार्यांना कमी गुणवत्तेचे, ट्रिव्हियल, स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणारे वगैरे म्हणणं हे चूक आहे. जोवर लेखन होत नाही, तोवर ते वेगळं आहे की नाही हे कसं कळेल? तेव्हा कायम उपलब्ध साहित्याबद्दल बोंब ठोकण्यापेक्षा किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार्यांना शेरेबाजीनं नामोहरम करण्यापेक्षा प्रत्येकाचंच स्वागत आणि कौतुक करायला काय हरकत आहे? इंटरनेटची लोकशाही तर सर्वोच्च प्रकारची लोकशाही आहे आणि ती तितक्याच उच्च दर्जाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही देते. तर आपलं स्वातंत्र्य आपण इतरांच्या अभिव्यक्तीला अधिक फुलवायसाठी वापरायचं की दडपायसाठी ते प्रत्येकानं ठरवायचं.
तर अशी सुरूवात झाल्यावर माझी हौस मुरत गेली नसती तरच नवल. मी चांगलाच लिहिता झालो. मुख्यत्वेकरून कथा लिहायचो, पद्य मनुष्य मी कधीच नव्हतो आणि हे सत्य मी फार पूर्वी मान्य केलं. एकदा पाय फ्रॅक्चर झाल्यावर मी प्लॅस्टरमध्ये वीस दिवस पडून होतो, तेव्हा एक रेल्वेकादंबरीस्टाईल ऍक्शन दीर्घकथादेखील लिहून काढली होती. एकदा एअरपोर्टवर विमानाची वाट पाहताना मी ई-तिकिटाच्या प्रिंटआऊटच्यामागे कथा लिहिली होती. घरातल्या अडगळींमध्ये आवराआवरी करताना आजही आईला मी कथा लिहिलेले कागदाचे कपटे अधूनमधून सापडतात. आणि हे सगळं 'मराठी ब्लॉग' ह्या माध्यमाची ओळख होण्यापूर्वी. त्याआधी कॉलेजात असताना मित्राच्या नादानं इंग्लिश ब्लॉग लिहायचो. आणि ते अत्यंत बालिश आणि माझ्या अत्यंत मर्यादित महाविद्यालयीन वर्तुळापर्यंतच सीमित असे ब्लॉग्ज असायचे.
तर मुद्दा हा की आजपासून अडीच वर्षांपूर्वी मराठीमध्ये ब्लॉग लिहायला सुरूवात करण्यापूर्वीदेखील मी लिहितच होतो आणि जेव्हा मी ब्लॉगवर काही लिहित नसतो, तेव्हाही कागदांवर मी लिहितच असतो. पण ब्लॉग हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे.
आपण सर्वप्रथम ब्लॉग म्हणजे काय ते पाहू. Blog म्हणजे Weblog ह्या शब्दाचं छोटं, सुटसुटीत रूप आहे. Web वर ठेवला जाणारा Log अर्थात ढोबळमानानं ऑनलाईन दैनंदिनी. पण ब्लॉग तिथपर्यंतच मर्यादित राहिला नाही. सुरूवातीला इंग्रजीनं आणि नंतर इतरही अनेक ज्ञानभाषांमध्ये समृद्ध असे ब्लॉग्ज जगभरात तयार झाले. ब्लॉगचा वापर नुसती दैनंदिनी म्हणून करणारे जसे लोक आहेत, तसेच ब्लॉग म्हणजे ऑनलाईन ग्रंथच बनवणारेही अनेक महाभाग आहेत. आणि इतका लवचिकपणा हीच ब्लॉगची मुख्य खासियत. थोडक्यात ब्लॉग म्हणजे महाजालावरचा एक असा कोपरा जो वेळ पडल्यास सगळ्या जगालाही दिसू शकतो. अनेकजण असा स्वतःचा कोपरा केवळ मर्यादित वर्तुळापर्यंतच सीमित ठेवतात अर्थात त्याही बाबतीत ब्लॉग हे लवचिक माध्यम आहे. पण ज्याप्रकारे इंटरनेटचा प्रसार होऊ लागला, त्यामुळे ब्लॉगिंग हे संवादाचं एक माध्यम बनू लागलं. अगदी राज्यक्रांत्यांमध्येची ब्लॉगिंगनं बरीच महत्वाची भूमिका वठवली. अर्थात ब्लॉगिंग ही एक भाषा बनली. आणि मग ज्याप्रकारे प्रत्येक भाषेच्या बाबत होतं, त्याप्रमाणेच ब्लॉगिंगबाबतही गुणात्मक आणि संख्यात्मक तुलनांना सुरूवात झाली. इंग्रजी, फ्रेंच, चायनीज, रशियन, स्पॅनिश इत्यादी मोठा सुशिक्षित आणि इंटरनेट उपलब्ध असलेला वर्ग असणार्या भाषांमध्ये अनेक ब्लॉग्ज निर्माण झाले. ह्या ब्लॉगिंग जगतांमध्येदेखील निश्चितच अशा प्रकारची ओरड कोणत्या न कोणत्या कालावधीमध्ये झाली असणारच, पण मी तितका शोध घेतला नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण सध्या, सध्या कशाला, मी जितके दिवस ब्लॉगिंग करतोय तितके दिवस मी 'मराठी ब्लॉग्जचा दर्जा उंचावत नसल्याची खंत' व्यक्त करणारे उसासे वाचतोय. गंमतीचा भाग असा की की लहानपणापासून मी 'मराठी भाषा मरणासन्न आहे' असलेही उसासे ऐकत आलोय आणि त्या उसाशांना काहीही अर्थ नसतो हे मला नेहमीच तितक्याच प्रकर्षाने वाटत आलंय.
आता आपण मराठी ब्लॉगिंगबद्दलच्या काही ठळक काळज्या पाहू -
१. मराठीत विषयांचं वैविध्य नाही.
-मी स्वतः अत्यंत थोडेसेच ब्लॉग्ज पाहिले आहेत आणि माझ्या अत्यंत तुटपुंज्या परिघामध्येही एक फोटोग्राफीचा ब्लॉग, भरपूर ट्रेकिंगचे ब्लॉग्ज, ललितलेखनाचे विपुल ब्लॉग्ज, कथा/लघुकथा, कविता, तांत्रिक बाबींशी संबंधित ब्लॉग्ज, पाककला, चित्रकला, हस्तकला, समाजकार्यातले अनुभव, प्रवासवर्णनं, रामायण, महाभारत इत्यादी इत्यादी ब्लॉग्ज मी पाहिलेत. मी स्वतः अत्यंत छोटा अन सामान्य मनुष्य असल्यानं मला जास्त विषयांमध्ये गती नाही त्यामुळे मी फारसे वैविध्यपूर्ण ब्लॉग्ज शोधले नाहीत. पण न शोधताही जर मला इतके मिळाले असतील, तर बाकीचेही काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, एखादा ब्लॉग हा एकाच विषयाला वाहिलेला असावा असा एक टीकाकारांचा सार्वत्रिक अट्टाहास मला जाणवतो, तो अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीनं एका विषयासाठी एकच ब्लॉग लिहिला तरच तो गुणात्मकदृष्ट्या वरचढ का गणाला जावा? जर एखाद्यानं त्याची फोटोग्राफी, चित्रकला, हस्तकला, तांत्रिक बाबी आणि ललितलेखन एकाच ब्लॉगवर केलं तर लगेच त्याला ललित ब्लॉगर म्हणून हिणवायचं? हे म्हणजे 'लघुत्तम सामायिक विभाजक' काढण्यासारखं आहे आणि तेदेखील चुकीचा. कारण कुठल्याही प्रकारचं लेखन कमी दर्जाचं जास्त दर्जाचं असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे. ललित लिहिलं की वाईट, विवेचन केलं की चांगलं, इंग्रजीमिश्रित बोलीभाषा वापरली की वाईट, जडबंबाळ अललंकारिक लिहिलं की चांगलं ही वर्गवारी कशासाठी?
ज्याप्रमाणे कुठलाही एक मनुष्य दुसर्याप्रमाणे नसतो, त्याप्रमाणे कुठलीही एक अभिव्यक्ती दुसर्या अभिव्यक्तीसारखी नसते. त्यामुळे एकाच शाळेत, एकाच बाकावर एकाच तासाला बसणारी दोन मुलं त्या तासात घडलेल्या घटनांचं संपूर्ण वेगळं वर्णन करतील. ते आपलं 'एकच कुत्रा आहे म्हणून आमचा निबंध सारखा आहे' असल्या बालिश जोकसारखं कधीच नसतं. तस्मात एकाच धाटणीचे ब्लॉग असं म्हणून जे एक जनरलायझेशन केलं जातं ते मला पूर्णपणे आक्षेपार्ह वाटतं.
२. मराठी ब्लॉगिंगमध्ये रोजच्या घडामोडींबद्दल किंवा फक्त स्वतःच्याच परिघातल्या अनुभवांबद्दल अत्यंत ट्रिव्हियल लिहिणार्या ब्लॉग्जचाच भरणा जास्त आहे. थोडक्यात ब्लॉग ह्या माध्यमात 'नवा विचार' येत नाही.
-मी कुणी मोठा लेखक नाही की लोकप्रिय ब्लॉगर नाही की कॉम्प्युटर आहे आणि मराठी टंकलेखन जमतंय म्हणून चार ओळी खरडणारा हौशी मनुष्यही नाही, पण मी ह्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे. कारण कधी मी लेखक म्हणून लिहितो, तर कधी मनातलंच ललितलेखनाच्या माध्यमातून लिहून चार समविचारी लोकांचे प्रतिसाद मिळावेत म्हणून लिहितो, तर कधी निव्वळ हातात लॅपटॉप आहे म्हणून लिहितो. आणि हो, मीसुद्धा वाचलेली पुस्तकं, पाहिलेला सिनेमा किंवा मस्त जमलेली ट्रीप ह्यांवर ब्लॉगपोस्ट लिहितो. पण जेव्हा 'मराठी ब्लॉगिंगमध्ये नवा विचार येत नाही' असली ओरड होते, तेव्हा मोठी मौज वाटते.
मुळात 'नवा विचार' ही किती सापेक्ष संकल्पना आहे. जी व्यक्ती फक्त स्वतःच्या घरातल्या गोष्टी ब्लॉगवर लिहिते, त्या व्यक्तीनं कथा लिहिणं हा 'नवा विचार' ठरतो. जी व्यक्ती पुस्तक परीक्षणं लिहिते, तिनं ललित लिहून पाहणं हा 'नवा विचार' ठरतो आणि जी व्यक्ति अक्षरशः डोक्यात चाललेल्या कुठल्याही विचारचक्रावर लिहिते, तिनं कविता लिहिणं हा 'नवा विचार'च नाही का?
फक्त दणदणीत शब्दप्रयोग करून वैचारिक लिहिणं म्हणजेच 'सध्याच्या विचारांपलिकडचं' होऊ शकत नाही. अर्थापलिकडला अर्थ शोधणं आणि तो शब्दांकित करणं हा निश्चितच कौतुकास्पद 'नवा विचार' ठरतो, पण फक्त तोच नवा विचार ठरतो हे आक्षेपार्ह आहे. असं लिहिणार्यानं एकदा घरात काय घडतंय, ते हलक्याफुलक्या बोलीभाषेत (मग ती इंग्रजीमिश्रित का असेना) शब्दांकित करून पाहणं, हा निश्चितच 'नवा आणि सध्याच्या विचारांपलिकडचा' विचार ठरू शकतो. किएस्लोव्स्कीचे 'थ्री कलर्स' हे तीन सिनेमे, तिन्ही संपूर्ण वेगवेगळ्या धाटणीचे. एकामध्ये डार्क ह्यूमरमध्ये दडलेला सिम्बॉलिझम, दुसर्यामध्ये कोंबून भरलेला थेट अंगावर येणारा सिम्बॉलिझम आणि तिसर्यामध्ये प्रचंड स्टाईलबाज सिम्बॉलिझम. डेकालॉगचे दहाही एपिसोड वेगवेगळ्या धाटणीचे, एकात रडायला येईल, तर दुसर्यात घृणा वाटेल, तिसर्यात थरारून जायला होईल तर चौथ्यात चेहर्यावर स्मितहास्य येईल. हा 'नवा विचार'. जर किएस्लोव्स्की फक्त सिम्बॉलिझमला कवटाळून बसला असता, तर सिम्बॉलिझमवरचे त्याचे इतके प्रयोग पाहायला कुणी थेटरात फिरकलंही नसतं किंवा त्यावर तासनतासाचा अभ्यास करून लेख पाडायचीही कुणी तसदी घेतली नसती. क्युब्रिकचा प्रत्येक सिनेमा त्याच्या मागच्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. त्याला 'सध्याच्या विचारापलिकडे जाणं' म्हणतात. जर तो प्रत्येकच सिनेमात 'अर्थामागचे अर्थ' शोधत बसला तर अभिव्यक्तीची बोंब होईल ह्याची त्याला कल्पना असते.
उद्या जर टॉड फिलिप्सनं (हँगओव्हरचा दिग्दर्शक) किएस्लोव्स्कीच्या 'द पर्गेटरी' चं काम पूर्ण करायला घेतलं तर ते त्याला जमेल का? आणि क्रिश्तॉफ पिएशिविचला जर 'हँगओव्हर ४' ची स्क्रिप्ट लिहायला सांगितली तर ती त्याला जमेल का? सांगण्याचा मुद्दा हा की अगदी एखाद्याला नसेलच 'नवा विचार' करायचा तर काय हरकत आहे? 'जरी राजहंसाचे चालणे जगी झालें या शहाणे, म्हणोनि काय कवणें चालोचि नये?'
रडगाणी गाण्यापूर्वी थोडा विचार केलेला बरा असतो.
३. मराठी लेखक, खेळाडू, गायक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील कुणीही ब्लॉगलेखनाकडे वळलेले दिसत नाहीत.
-हा एक अत्यंत योग्य मुद्दा आहे. मराठी ब्लॉगजगताला वेगळा आयाम मिळवून देण्यामध्ये ही गोष्ट मोलाची ठरू शकते. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्याकडे शाळेनंतरचं शिक्षण मराठीमध्ये उपलब्ध नाही, आणि असलं तरी ते कुणी घेत नाही कारण त्याचा वास्तविक जगात उपयोग होत नाही हे कटू सत्य आहे. थोडक्यात मराठी ही ज्ञानभाषा नाही. त्यामुळे व्यावसायिक शब्दकोष किंवा खेळामधल्या संज्ञा, शास्त्रीय संज्ञा ह्या मराठीतून एकतर असणं आणि असल्या तरी प्रथितयश किंवा त्या त्या क्षेत्रातले जाणकार, खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा व्यावसायिक व्यक्तींना ब्लॉगमधून तितक्या पातळीपर्यंत मराठीतून व्यक्त होणं अंमळ अवघडच दिसतं. पण हो, गायक, लेखक, संगीतकार किंवा अगदी व्यावसायिकही काही काही मार्गांनी निश्चितच मराठीतून व्यक्त होऊ शकतात. जुन्या काळातले उत्तम शास्त्रज्ञ उदा नारळीकर किंवा बाळ फोंडकेंसारखे उत्तम शास्त्रीय लेखक आताच्या पिढीत न होण्याची कारणमीमांसा थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत घेऊन जाते आणि ह्या विषयामध्ये लिहिण्या/बोलण्यासारखं इतकं काही आहे की माझ्या मर्यादित बुद्धीनं मी काही लिहिणं चुकीचं ठरेल.
थोडक्यात, वाट बिकट आहे, पण जर प्रथितयश लोकांनी मराठीत प्रयत्नपूर्वक लिहिलं (जसं अमिताभ बच्चन हिंदीत ब्लॉगिंग करतात), तर मराठी ब्लॉगजगताला एक नवा आयाम मिळेल ह्यात शंकाच नाही.
४.तांत्रिकदृष्ट्या मराठी ब्लॉग्जना अजून बरीच मजल गाठायची आहे.
-अजून एक योग्य मुद्दा. मराठीमध्ये टंकलेखनाची सुविधा ही तुलनेने अलिकडची घटना आहे. त्यामुळे मराठी ब्लॉगलेखनही अलिकडचंच. त्यातली बरीच मंडळी अशी आहेत जी इंग्रजी ब्लॉग्ज वाचत नाहीत किंवा लिहितही नाहीत त्यामुळे तिथल्या विविध संकल्पनांची ओळख नाही. आणि ब्लॉग लिहिणारे सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले किंवा रोजच्या रोज संगणकाशी निगडीत कामें करणारे नाहीत, त्यामध्ये गृहिणी, पेन्शनर्स आणि इतरही अनेक व्यावसायिकांचा भरणा आहे, ज्यांना ब्लॉगचा आराखडा, प्लगिन्सची व्यवस्था इत्यादी गोष्टींबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. त्यामुळे मराठी ब्लॉग्जमध्ये दिसायला सुटसुटीत आणि विविध सोयीसुविधांनी युक्त असे ब्लॉग्ज फारच कमी आहेत.
ह्या बाबतीमध्ये सुधारणेला बराच वाव आहे.पण सध्या ब्लॉगजगतात तांत्रिक बाबी स्पष्ट करून, समजावून सांगणारे अनेक ब्लॉग्ज आहेत आणि त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लवकरच चित्र पालटलेलं बघायला मिळण्यास हरकत नाही.
५. शुद्धलेखन आणि परिच्छेद, विरामचिह्ने इत्यादी लेखनविषयक तांत्रिक बाबी.
-इंग्रजी माध्यम आणि तत्सम मुद्द्यांमुळे मराठी शुद्धलेखन किंवा प्रमाण (राजमान्य) मराठी शुद्धलेखन हा एक काळजीचा विषय आहे. योग्य परिच्छेद पाडणं, र्हस्व-दीर्घ आणि स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे योग्य पद्धतीने किती जणांना जमत असेल ते सांगणं कठीण आहे. पण इथे आपल्याला अभिव्यक्ती महत्वाची आहे की सादरीकरण हा एक मुद्दा कळीचा ठरतो. भाषेचा मूळ उद्देश संवाद साधला जाणं आणि माहितीची देवाणघेवाण होणं हा आहे असं धरून चालल्यास तांत्रिक माहिती किंवा प्रवासवर्णनपर किंवा तत्सम माहितीपर ब्लॉग्जमध्ये शुद्धलेखन किंवा परिच्छेदांचा मुद्दा बाजूला ठेवता येईल, पण अर्थातच कविता किंवा कथा ह्यांमध्ये ह्याची अपेक्षा ठेवणं रास्त ठरेल.
पण एकंदरितच सरसकट सर्वत्रच शुद्धलेखन, परिच्छेद हा अट्टाहास धरून चालणं म्हणजे थोडासा अतिरेकच म्हणावा लागेल. सादरीकरण महत्वाचं आहे, पण अभिव्यक्तीचाच गळा घोटणारं सादरीकरण काय कामाचं हाही विचार व्हायला नको काय? माध्यमाला सरावल्यानंतर आपोआपच सादरीकरणात सफाई येऊ लागते. पण सादरीकरणाच्या नावाने गळे काढून नवीन अभिव्यक्ती दडपण्यात काय हशील?
मी एव्हढं सगळं पाल्हाळ लावण्याचं कारण एव्हढंच होतं, की मराठी ब्लॉगिंगमध्ये नव्या वाटा चोखाळल्या जाव्यात हा विचार मांडताना जी सद्यस्थितीबद्दल ओरड होते आहे ती अनाठायी आणि संकुचित मनोवृत्तीची आहे असं माझं ठाम मत मला मांडायचं होतं. आणि त्याचसोबत मराठी ब्लॉगिंग माझ्या नजरेतून खरोखरच कुठे आहे, ह्याचीही एक पडताळणी करायची होती. मी कुणीही तीसमारखाँ नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो, पण जे खटकलं किंवा वाटलं ते मांडण्याचं माझं स्वातंत्र्य वापरून मी हे लिहितोय.
नव्या वाटा ह्या कायमच उपलब्ध असतात, अगदी इंग्रजी ब्लॉगजगतामध्ये सर्व काही पादाक्रांत झालंय असा दावा कुणीही करणार नाही, त्यामुळे नव्या वाटा अन नव्या विचारांसाठी आत्ता लिहिणार्या किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणार्यांना कमी गुणवत्तेचे, ट्रिव्हियल, स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणारे वगैरे म्हणणं हे चूक आहे. जोवर लेखन होत नाही, तोवर ते वेगळं आहे की नाही हे कसं कळेल? तेव्हा कायम उपलब्ध साहित्याबद्दल बोंब ठोकण्यापेक्षा किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार्यांना शेरेबाजीनं नामोहरम करण्यापेक्षा प्रत्येकाचंच स्वागत आणि कौतुक करायला काय हरकत आहे? इंटरनेटची लोकशाही तर सर्वोच्च प्रकारची लोकशाही आहे आणि ती तितक्याच उच्च दर्जाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही देते. तर आपलं स्वातंत्र्य आपण इतरांच्या अभिव्यक्तीला अधिक फुलवायसाठी वापरायचं की दडपायसाठी ते प्रत्येकानं ठरवायचं.
टीप - काल नजरचुकीने काही वाक्यांची दोन परिच्छेदांमध्ये पुनरूक्ती झाली होती. ती दुरूस्त केली आहे.